पाऊस वाढणार! महाराष्ट्रासाठी पुढील 6 दिवस महत्त्वाचे, या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा. punjab dakh andaz

punjab dakh andaz महाराष्ट्रामध्ये मान्सून परतण्याचा प्रवास थांबला असून, येत्या 23 ते 29 सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होऊ शकते. यामुळे नवरात्रीच्या सुरुवातीलाच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा धोका वर्तवण्यात आला आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी याबाबत माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे शेतीत मोठं नुकसान झालं असून, काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांत बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे 150 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अहमदनगर, सोलापूर, जळगाव, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस झाला आहे.

हे पण वाचा:
kharip rabbi 2024 Pikvima update 2024 चा वाढीव पीक विमा या शेतकऱ्यांना मिळणार? kharip rabbi 2024 Pikvima update

जिल्ह्यानुसार पावसाचा अंदाज punjab dakh andaz

  • 23 सप्टेंबर: नाशिक, सोलापूर, लातूर, परभणी आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
  • 24 सप्टेंबर: पावसाचा जोर थोडा कमी होईल आणि पूर्व विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
  • 25 सप्टेंबर: नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
  • 26-27 सप्टेंबर: पुणे, रायगड, सातारा, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड यासह अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडेल. काही ठिकाणी 150 मिमी पेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो.
  • 28 सप्टेंबर: मुंबई, ठाणे, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे.

शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे. पूर येण्याची शक्यता असल्याने सतर्क राहणे आवश्यक आहे.

Leave a Comment