नवरात्रीत पावसाचा जोर वाढणार; आज अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर आजही कायम राहणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, २२ सप्टेंबर रोजी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणसह अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने नवरात्रीच्या काळातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे Maharashtra Rain Alert

काल अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस

काल रात्री नांदेड, जालना, बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. धाराशिव आणि रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाची नोंद झाली, तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि सोलापूरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. विदर्भाच्या उत्तर आणि पूर्व भागांतही पाऊस झाला.Maharashtra Rain Alert

आजचा (२२ सप्टेंबर) पावसाचा अंदाज

हवामान अंदाजानुसार, आज दिवसभरात खालील भागांमध्ये पावसाची शक्यता आहे:

हे पण वाचा:
kharip rabbi 2024 Pikvima update 2024 चा वाढीव पीक विमा या शेतकऱ्यांना मिळणार? kharip rabbi 2024 Pikvima update
  • मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र: छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो. काही ठिकाणी पूर येण्याचीही शक्यता आहे.
  • उत्तर महाराष्ट्र आणि कोकण: नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या पूर्वेकडील भागांत पावसाचा अंदाज आहे. कोकणात, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे हलका ते मध्यम पाऊस पडेल.
  • विदर्भ: पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, तर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि यवतमाळमध्ये हलका पाऊस होऊ शकतो.

नवरात्रीतही पाऊस सुरूच

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, जे पुढे ‘डिप्रेशन’मध्ये बदलण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे नवरात्रीच्या काळातही राज्यात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज आहे.

अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

हवामान विभागाने आज, २२ सप्टेंबर रोजी, राज्यातील अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमधील नागरिकांनी पावसाच्या शक्यतेमुळे सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.Maharashtra Rain Alert

हे पण वाचा:
PM kisan 24th installment मोठी अपडेट पीएम किसान 24 वा हप्ता; कधी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये? PM kisan 24th installment

Leave a Comment