Panjabrao Dakh: हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढील काही दिवस राज्यात जोरदार पाऊस पडणार असल्याने, शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची, विशेषतः सोयाबीन आणि उडदाची, काळजी घ्यावी असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला आहे.
डख यांच्या अंदाजानुसार, राज्यात १५ ते १८ सप्टेंबर आणि त्यानंतर पुन्हा २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक असेल.Panjabrao Dakh
पावसाचे दोन मोठे टप्पे:
- पहिला टप्पा (१५ ते १८ सप्टेंबर): आज, १५ सप्टेंबरपासूनच राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. यात प्रामुख्याने विदर्भ (नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती), मराठवाडा (नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव) आणि पश्चिम महाराष्ट्र (सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर) या भागांमध्ये जोरदार पाऊस अपेक्षित आहे.
- दुसरा टप्पा (२५ ते २७ सप्टेंबर): या काळातही राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील काही दिवसांसाठी आपली शेतीची कामे जपून करावीत.Panjabrao Dakh
सोयाबीन काढणीसाठी महत्त्वाचा सल्ला:
डख यांनी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी दिली आहे. १८ ते २३ सप्टेंबर या काळात पावसाची उघडीप असेल. या वेळेचा उपयोग सोयाबीन आणि उडीद काढणीसाठी करावा असे त्यांनी सांगितले. “शेतकऱ्यांनी दुपारी लवकर सोयाबीन काढून घ्यावे, थोडे वाळवून लगेच गंजी लावून झाकून ठेवावे. असे केल्याने पिकांचे नुकसान टळेल,” असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला आहे.Panjabrao Dakh
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा:
या परतीच्या पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीसह इतर नद्यांच्या काठावरील गावांनी सतर्क राहावे. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली जनावरे आणि शेतीचे पंप सुरक्षित ठिकाणी हलवावेत, असे आवाहन डख यांनी केले आहे.
याव्यतिरिक्त, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ऑक्टोबरमध्येही काही ठिकाणी पाऊस पडेल आणि त्यानंतर २ नोव्हेंबरपासून राज्यात थंडीची सुरुवात होईल.Panjabrao Dakh