Crop Insurance : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांचे (Farmers) मोठे नुकसान झाले आहे. या संकटातून सावरण्यासाठी शेतकरी सरकारी मदतीची वाट पाहत असतानाच, नुकसान भरपाईच्या निधीबाबत एक मोठी आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकसान भरपाईसाठी आतापर्यंत ६९७ कोटी रुपये इतका निधी शासनाकडून प्राप्त झाला असून, उर्वरित ७२१ कोटी रुपयांचा निधी येत्या एक-दोन दिवसांत प्राप्त होईल.Crop Insurance
नुकसान भरपाईचे पैसे तातडीने मिळवण्यासाठी ‘हे’ काम करा!
शासनाकडून आलेला नुकसान भरपाईचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा व्हावा यासाठी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी शेतकऱ्यांना एक अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे.
विभागीय आयुक्तांनी म्हटले आहे की, “माझी शेतकऱ्यांना एक विनंती आहे, त्यांनी त्यांच्या नोंदीप्रमाणे ई-केवायसी (e-KYC) करून घ्यावे. जेणेकरून नुकसानभरपाईची रक्कम तात्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.”
शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसी पूर्ण असेल, तर नुकसान भरपाईचे पैसे थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी तालुका पातळीवर नेमलेली टीम सज्ज आहे.Crop Insurance
पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत, मदतीसाठी ‘एनडीआरएफ’ निकष
यंदाच्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचे (Crop Insurance) पैसे मिळू शकणार नाहीत, ही एक महत्त्वाची बाब समोर आली आहे.
- नवीन नियमानुसार: कापणीअंतीच पीक विम्याचे पैसे मिळू शकतात. पीक विम्याच्या नव्या नियमांमुळे अतिवृष्टीसारख्या स्थानिक आपत्तीसाठी पीक विम्याचे पैसे मिळणे कठीण झाले आहे.
- जुने नियम: जुन्या योजनेत उगवण न होणे, स्थानिक आपत्ती, पोस्ट हार्व्हेस्टिंग अशा पाच घटकांवर नुकसान भरपाई मिळत होती. मात्र, आता हा नियम बदलला आहे.
त्यामुळे, आता शेतकऱ्यांना पीक विम्यातून मदत न मिळता, एनडीआरएफच्या (NDRF) निकषानुसार (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या नियमांनुसार) सरकारी मदत करण्यात येईल, असे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
पंचनाम्याचे काम कुठपर्यंत आले?
- जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंतचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, त्याचे अंतिम अहवाल सरकारला सादर करण्यात आले आहेत.
- जुलै महिन्यापर्यंतचा निधी मिळाला आहे, तर ऑगस्ट महिन्याचा काही निधी येणे बाकी आहे.
- या सप्टेंबर महिन्यातील पंचनामे पाऊस ओसरल्यानंतर पुढील आठ दिवसांत पूर्ण केले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.
शेतकऱ्यांनी आपल्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ जमा करण्यासाठी विनाविलंब ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.Crop Insurance