शेतकऱ्यांना दिलासा सरकार देणार शेतकऱ्यांना मदत: कृषिमंत्री ativrushti anudan

ativrushti anudan राज्याच्या अनेक भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत, राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवारफेरीच्या उद्घाटनावेळी बोलताना कृषिमंत्र्यांनी सांगितले की, पाऊस थांबल्यानंतर लगेचच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील आणि त्यानंतर बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाईल.

हे पण वाचा:
gold price increse update सोन्याचे दर 1,43,000 प्रती 10 ग्रॅम !. gold price increse update

नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू ativrushti anudan

कृषिमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच आर्थिक मदत दिली जाईल.

यासोबतच, राज्यात सध्या युरियाच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असून, लवकरच शेतकऱ्यांसाठी ‘चांगली बातमी’ मिळेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

कृषी विद्यापीठांमधील रिक्त पदांवर लवकरच निर्णय

या कार्यक्रमादरम्यान, कृषी विद्यापीठांमध्ये असलेल्या रिक्त पदांवरही कृषिमंत्र्यांनी भाष्य केले. पुढील दोन महिन्यांत या पदांबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी लवकरच बांबूच्या कुंपणाची योजना आणली जाईल, असे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

हे पण वाचा:
old satbara जुना ७/१२ आणि फेरफार उतारा ऑनलाइन कसा मिळवायचा? old satbara

शिवारफेरीचा शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात तीन दिवसांच्या शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या 43 व्या शिवारफेरीत 20 एकर जागेवर खरीप पिके, भाजीपाला आणि फुलवर्गीय पिकांचे 212 वाण आणि तंत्रज्ञान एकाच ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे विदर्भातील 11 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

हे पण वाचा:
nuksan bharpai madat अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई मंजूर; शेतकऱ्यांसाठी ₹७९६ कोटी. nuksan bharpai madat

Leave a Comment