महाराष्ट्रात पुन्हा ‘रेड अलर्ट’! मुंबईसह ११ जिल्ह्यांत मुसळधार!Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update: मागील आठवडाभर राज्यातील शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या पावसाने आता पुन्हा एकदा जोर पकडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे येत्या शुक्रवारपासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे.

हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, शनिवार, २८ सप्टेंबर रोजी मुंबईसह राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.Maharashtra Weather Update

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी आधीच संकटात असताना, राज्यात पुन्हा पावसाचे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारपासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर पाऊस पडणार आहे.

हे पण वाचा:
farmer loan waiver शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! सरकारने मंजूर केली २ लाखांपर्यंत कर्जमाफी; या 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ farmer loan waiver

आजची (गुरुवारची) स्थिती: आज चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

उद्यापासून (शुक्रवार) राज्यात सर्वत्र पाऊस: धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे तीन जिल्हे वगळता, राज्यातील इतर सर्वच जिल्ह्यांमध्ये उद्या पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे.Maharashtra Weather Update

या ११ जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शनिवार, २८ सप्टेंबर रोजी खालील ११ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे:

हे पण वाचा:
Hawaman Andaj 2026 च्या मान्सूनमध्ये पावसाचा खंड पडणार? डॉ. रामचंद्र साबळे यांचा हवामान अंदाज! Hawaman Andaj
  • कोकण: मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  • पश्चिम महाराष्ट्र (घाट परिसर): पुणे (घाटमाथा), कोल्हापूर (घाटमाथा), सातारा (घाट परिसर)
  • मराठवाडा: नांदेड, लातूर, धाराशिव

या जिल्ह्यांतील नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी सतर्क राहून योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पुण्यात पुढील तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस

पुण्यासाठीही हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

  • राजस्थानमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी, महाराष्ट्रात मात्र मान्सून अजूनही सक्रिय आहे.
  • मध्य महाराष्ट्र, पुणे-मुंबई आणि घाटमाथ्यावर २८ आणि २९ सप्टेंबरला पावसाचा जोर वाढलेला दिसेल.

पावसाचा हा वाढलेला जोर शेतकरी आणि प्रशासनासाठी पुन्हा एकदा चिंतेची बाब ठरू शकतो. नागरिकांनी घरातून बाहेर पडताना हवामानाचा अंदाज घेऊनच निघावे.Maharashtra Weather Update

हे पण वाचा:
Regular Karjdar vyaj savlat Yojana नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! व्याज सवलत आता DBT द्वारे मिळणार  Regular Karjdar vyaj savlat Yojana

Leave a Comment